राहुरी : देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या मुख्य पाईपलाईनवर जोडलेले सर्व "अनाधिकृत नळ जोड तत्काळ बंद करून, देवळाली प्रवरा हद्दीतील नागरिकांची सन २०१५ नंतर वाढविण्यात आलेली ४०० रूपये पाणीपट्टी कमी करावी" आदी प्रमुख मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने देवळाली प्रवरा नगरपरिषदेवर गुरुवार (ता. १९)ला आसूड मोर्चा व ठिय्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले.
जिल्हाधिकारी यांचा जमाव बंदी आदेश क्र. डी. सी./कार्या/९ब१/२४३५/२०२३ दि.१०/१०/२०२३ नुसार संपूर्ण जिल्ह्यात १३ ते २६ ऑक्टोबरपर्यंत पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास व आंदोलन करण्यास मनाई हुकूम जारी झाल्याने प्रहार चे देवळाली प्रवरा नगरपरिषदेवरील आसूड मोर्चा आणि ठिय्या आंदोलन आंदोलनाची मूळ नोटीस कायम ठेवून तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे.
२६ ऑक्टोबरपर्यंत देवळाली प्रवरा नगरपरिषदेने प्रहार जनशक्ती पक्षाच्या आंदोलनातील सर्व मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा, कोणतीही पूर्व सूचना न देता जमावबंदी उठल्यानंतर कोणत्याही क्षणी नगरपरिषदेवर प्रहारचे वतीने पुन्हा हे आंदोलन करण्यात येईल.
तसेच देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना वेळेत माहिती देऊनही त्यांनी या अनधिकृत जोडवर मूदतीत कारवाई केली नाही. त्यामुळे नागरीकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे आणि होत आहे.
त्याबरोबर मुख्याधिकारी यांनी अनधिकृत नळ जोड बंद केल्याचे खोटे लेखी पत्र देऊन नागरीकांची दिशाभूल केली आहे म्हणून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची वरिष्ठांकडे प्रहारचे वतीने मागणी करण्यात येणार आहे.
देवळाली प्रवरा शहरातील बहुसंख्य नागरिकांनी मोर्चात सहभागी होण्यासाठी कळवून प्रहारचे मनोधैर्य वाढविले व सर्व प्रहार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजूट दाखविले. त्याबद्दल सर्वांचे हार्दिक आभार व धन्यवाद. यापुढेही सर्वांचे प्रेम व भक्कम पाठिंबा प्रहार सोबत असाच कायम राहो अशी अपेक्षा
देवळाली प्रवराचे शहर प्रमूख किरण पंडित, शरद वाळुंज, नवनाथ चव्हाण, भाग्यश्रीताई कदम, रजनीताई कांबळे, अशोक देशमुख, एकनाथ वाणी, गणेश भालके, आशा माळी, सुरेखा पंडीत, वंदना कांबळे, अफसाना सय्यद,लैला शेख तसेच सर्व प्रहार शाखा प्रमूख, उप प्रमूख, सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते.
Post a Comment