नगर ः दक्षिण भागातील नागरिकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी दर महिन्याला जनता दरबार आयोजित करणार आहे. मला लोकांना भेटण्याचा कधीही कंटाळा नाही लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकाऱ्यांनी सुध्दा होमवर्क करून येण्याचा सल्ला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला.
महसूलमंत्री विखे पाटील यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयात जनता दरबार घेऊन नागरिकांचे प्रश्न जाणून घेतले. विविध प्रश्नाच्या बाबतीत त्यांनी संबबित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना करून तातडीने समस्या निकाली काढण्याबबात आदेश दिले.
जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग प्रा.भानुदास बेरड वसंत लोढा भैय्या गंधे यांच्यासह पदाधिकारी अधिकारी याप्रसंगी उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील यांचा जनता दरबार नेहमीच लक्षवेधी असतो.उतर नगर जिल्ह्याच्या सर्व तालुक्यात या जनता दरबाराचा अनुभव जनतेला आहे.आता नगर दक्षिण भागात जनता दरबाराचे आयोजन प्रत्येक महिन्यात करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. आजच्या जनता दरबारामध्ये आलेल्या प्रत्येक नागरिकाशी मंत्री विखे पाटील यांनी संवाद साधला.प्रत्येक तालुक्यातून आलेले कार्यकर्ते आणि नागरीकांची चौकशी करीत त्यांनी प्रश्न सोडविण्यासाठी आश्वासित केले.
जनता दरबार संपल्यानंतर विखे पाटील यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून संवाद साधला.तालुका आणि जिल्हा स्तरावरील सर्व अधिकार्यांनी सामान्य माणसाला न्याय देण्याच्या भूमिकेतून काम करण्याचे आवाहन करून जनता दरबार ही संकल्पना नगर दक्षिण भागात नविन असली तरी उतर नगर प्रमाणे दक्षिण भागात यामध्ये सात्तत्य ठेवून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आपले प्राधान्य असेल.
मला लोकांच्या भेटीचा किंवा त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कंटाळा नाही फक्त अधिकाऱ्यांनी होमवर्क करून येण्याचा सल्ला देण्यास मात्र विखे पाटील विसरले नाहीत.
Post a Comment