मुंबई ः राज्यातील अनेक गावात सर्वपक्षीय राजकीय पक्षांच्या नेत्यांची कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय नेत्यांना गावांत विरोध केल्याचे व्हिडीओही सोशल माध्यमातून वेगाने व्हायरल होत आहेत. त्यामुळे नेत्यांसह पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
लोकसभा निवडणूकीच्या तोंडावर गावांत येण्याला विरोध होत आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी सर्वपक्षीय राजकीय पक्षांच्या नेत्यांची कोंडी होत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय नेत्यांना गावांत विरोध केल्याचे व्हिडीओही सोशल माध्यमातून वेगाने व्हायरल होत आहेत.
या व्हीडीओमुळे इतरही गावांमध्ये नेत्यांना येण्यास मज्जाव केला जात आहे. त्यामुळे नेते मंडळीच्या अडचणी वाढल्या आहेत. आगामी काळात होणार्या सभांमध्ये काळेझेंडे दाखवून निषेध करण्यात येणार आहे. तसे नियोजन केले जाणार असल्याची चर्चा सुरु आहे.
मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिले, मात्र बहुतांश मराठा समाजाला ते मान्य नसल्याचे सांगत आहे. सग्या सोयऱ्याबाबत मसुदा काढला मात्र त्याची अमलबजावणी करण्याकडे शासन दुर्लक्ष करत असल्याचा लोकांचा आरोप आहे. त्याचे पडसाद राज्यातील अनेक गावगावांत दिसून येत आहेत.
Post a Comment