नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने देशातील विविध राज्यांतील 20 शाळांची मान्यता रद्द केली आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
उत्तर प्रदेश, दिल्ली, जम्मू व काश्मीर, राजस्थान, छत्तीसगड, आसाम, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश व्यतिरिक्त, या 20 शाळा केरळ आणि उत्तराखंडमधील आहेत.
सीबीएसईचे सचिव हिमांशू गुप्ता यांनी या प्रकरणी सांगितले की, या 20 शाळा नियमांविरुद्धच वागतानाच गैरव्यवहारातही सामील आहेत.
दरम्यान, महाराष्ट्रातील दोन शाळांचा यामध्ये समावेश आहे. राहुल इंटरनॅशनल स्कूल, ठाणे आणि पायोनियर पब्लिक स्कूल, पुणे या दोन शाळांची मान्यता रद्द केली आहे.
राज्यांच्या शाळा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दिल्लीत 5 आणि उत्तर प्रदेशात तीन शाळा आहेत. केरळ, महाराष्ट्र, राजस्थान व छत्तीसगडमध्ये प्रत्येकी दोन शाळा आहेत. जम्मू-काश्मीर, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि आसाममध्ये प्रत्येकी एक शाळा अशी आहे. ज्यांची मान्यता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने रद्द केली आहे.
Post a Comment