मुंबई ः आयपीएलच्या हंगामास आता सुरवात होण्याच्या अगोदरच अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. त्यावर सध्या क्रिकेट प्रेमींमध्ये जोरदार चर्चा सुरु झालेली आहे. याबाबत काहींनी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्यास सुरवात केली आहे. जोपर्यंत काम आहे, तोपर्यंत सलाम आहे, काम झाले की रामराम आहे. हा प्रकार फक्त क्रिकेटच्या मैदानातच नव्हे तर सर्वचक्षेत्रात प्रत्येकाला अनुभवायला मिळत आहे.
यंदा टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि महेंद्र सिंग धोनी यांचं कर्णधारपद गेलं आहे. दोन्ही खेळाडूंनी आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहेत. रोहित आणि धोनी यांनी आपल्या नेतृत्त्वाखाली संघाना पाचवेळा ट्रॉफी जिंकवून दिली आहे.
आयपीएल तोंडावर असताना ऋतुराजची निवड झाल्याने चाहते नाराज झाले. अशातच रोहित शर्मा यानेही एक पोस्ट केली आहे. तसेच क्रिकेट प्रेमींमधूनही आता काही पोस्ट व्हायरल केल्या जात आहे.
या पोस्टमधून समाजासह कोणतेही नोकरीचे क्षेत्र असो, तेथे कशा पध्दतीने माणसांचा कामापुरता वापर केला जातो, काम संपले की कसे माणसाला दूर केले जाते, हे स्पष्ट होत आहे. याबाबत अनेकांनी तशा प्रतिक्रिया समाज माध्यमावर दिलेल्या आहेत.
सरकारी असो की खासगी संस्थाच्या कार्यालयात नियमीत काम करणाऱ्यांवर नेहमीच अन्याय झालेला आहे. अडचणीच्या काळात काम करून घेऊन चांगले दिवस आल्यानंतर काम करणाऱ्याला बाजुला ठेवल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. ज्यांना असा अनुभव आला. त्यांनी तशा पोस्ट समाज माध्यमावर केलेल्या आहेत.
Post a Comment