आचारसंहिता १४ मार्चपासून लागणार....

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता साधारण १४ मार्च रोजी जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येत्या काळात सरकारकडून निर्णयांचा धुमधडाका लावण्यात येणार आहे. 


याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने येत्या आठवड्यात दोन दिवस मंत्रिमंडळ बैठकांचे आयोजन केले आहे. या बैठकीत मोठ्या निर्णयांची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याशिवाय येत्या काळात अनेक विभागांकडून विविध शासन निर्णयही जाहीर केले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीकरिता सर्वच राजकीय पक्षांनी सर्वस्व पणाला लावले आहे. येत्या १४ मार्च रोजी या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने शिंदे-फडणवीस सरकारनेही तयारीचा वेग वाढविला आहे. 

आचारसंहिता लक्षात घेता राज्य सरकारने गेल्या आठवड्याभरापासून अनेक निर्णयांना मंजुरी देण्यासाठी लगीनघाई सुरू केली आहे. त्यामुळेच येत्या आठवड्याभरात दोन दिवस मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ११ व १२ मार्च रोजी मंत्रिमंडळ बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. त्यात काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post