लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार....

बीड : बीडच्या सुर्डी गावात मोबाईल रेंज आणि टॉवर नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले असून लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालणार असल्याचा इशारा आता नागरिकांनी दिला आहे. सध्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सगळ्यात जवळचं साधन म्हणजे मोबाईल आहे. या मोबाईलमुळे जग जवळ आले आहे. 


एका क्षणात कुठे काय सुरू आहे? हे याच मोबाईल मधून पाहायला मिळतं. चांगलं काम असो की इतर कोणतेही काम या मोबाईलच्या माध्यमातून होत आहेत. मात्र एकीकडे देश महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत असताना, दुसरीकडे मात्र बीडच्या आष्टी तालुक्यात असणाऱ्या सुरडी गावात आजतागायत एकही टावर उभा नाही. 

यामुळे मोबाईल असूनही रेंज नसल्याने ग्रामस्थांचे अनेक कामे खोळंबली जात आहेत. यामुळे आता सुरडी ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत, येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ठराव ग्रामपंचायतमध्येच मंजूर करून घेतला आहे.

इंटरनेट व धकाधकीच्या जीवनामध्ये मोबाईल ही अतिशय जवळची वस्तू आहे. व्हॉट्सअप, फेसबुक व इंस्टाग्राम यासह इंटरनेटच्या या जगात, कुठं काय सुरू आहे, हे मोबाईल वरूनच माहिती मिळते. 

मात्र तोच मोबाईल गावात आल्यावर काम करत नाही. यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत या मोबाईलची रेंज डोकेदुखी बनली आहे. तर ही रेंज मिळवण्यासाठी गावात टॉवर उभाराव यासाठी गेल्या 20 वर्षापासून ग्रामस्थ पुरावा करत आहेत. मात्र अद्याप पर्यंत टॉवर उभा करण्यात आलं नाही. यामुळे ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post