जामखेड ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान बनविण्यासाठी खासदार सुजय विखे यांच्या रुपाने उमदा शिलेदार याला निवडून पाठवायचे आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री आ. राम शिंदे यांनी केले.
जवळा जिल्हा परिषद गटातील राजेवाडी, धानोरा अणखेरीदेवी येथील भाजपा बुथ कमिटीच्या प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अजय काशीद, जामखेड बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, डॉ भगवान मुरूमकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवी सुरवसे, भाजपा तालुका उपाध्यक्ष माजी सरपंच बापूराव ढवळे, भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष बाजीराव गोपाळ घुरी, माजी संचालक मनोज कुलकर्णी, आणखेरी देवी ट्रस्टचे अध्यक्ष रभांजी आढाव, सचिव रमेश तुपेरे, पिंपरखेडचे सरपंच राजेंद्र ओमासे, माजी सरपंच दादासाहेब वारे, माजी सरपंच अशोक राऊत, युवा नेते अजित यादव, राहुल चोरगे, शाहुराव जायभाय, पाटोदाचे सरपंच सदाशिव गवांदे, संतोष राऊत, परशराम राऊत, महादेव जायभाय, गणेश जायभाय, हर्षद शिंदे उपस्थित होते,
शिंदे म्हणाले की आज संपूर्ण भारतातील लोकांची राम मंदिर व्हावे म्हणून इच्छा होती.ही इच्छा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहे.यामुळे त्यांच्या हमीवर देशाचा विश्वास निर्माण झाला आहे. विरोधी आमदारांनी सांगितले की जामखेडला कुकडीचे पाणी देतो, पण त्या दिवसापासून आजपर्यंत लोक खोर घेऊन दारावर लोक पाण्याची वाट बघत आहेत. पण अद्यापही पाणी काही आले नाही. लोक तुमच्या खोट्या भुलथापांना बळी एकदा बळी पडले होते, आता पडणार नाहीत याचा विश्वास आहे. या वेळी खासदार सुजय विखे पाटील यांचे भाषण झाले.
Post a Comment