अतुल लहारे
नगर ः अहमदनगर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली आहे. यामध्ये महायुतीकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका टिपन्नी केली जात आहे. महाविकास आघाडीकडून महायुतीच्या नेत्यांवर टीका टिपन्नी सुरु आहे. मात्र या सर्व खेळात मात्र नाराज कार्यकर्ते बाजुलाच दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक फटका महायुतीला बसत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.
महायुतीमध्ये नाराजी आहे. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्नही करण्यात आलेला आहे. मात्र त्यात फारसे यश आलेले दिसून येत नाही. कारण अद्यापही महायुतीतील नाराज मंडळी प्रचारात सक्रीय झालेली नाही. ती सक्रीय कधी होईल, असा सवाल आता महायुतीतीलच नेत्यांसह कार्यकर्त्यांमधून केला जात आहे. विशेष वरिष्ठ नेत्यांकडूनही नाराजांची नाराजी काढण्याचा प्रयत्न झालेला आहे. मात्र त्यांची नाराजी दूर झालेली नाही.
मागील वेळेस जसे झाले तसेच जर पुढे झाले तर त्याला जबाबदार कोण राहणार असा थेट सवालच आता नेते मंडळी करीत आहेत. कामापुरते आता गोड बोलून त्यांचा स्वार्थ साधून घेतील. आणि मागील विधानसभा निवडणुकीत जे झाले तसेच या वेळी झाले तर आम्ही काय करायचे असा थेट सवालच आता नाराजांकडून केला जात आहे. मागे झाले तसे होणार नाही,
सर्वजण एकदिलाने काम करून असे सांगून नाराजांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची चर्चा सध्या महायुतीच्या नेत्यांमध्ये सुरु आङे. परंतु कोणीच शब्दावर भरवसा ठेवायला तयार नाही. मागील वेळीही शब्द दिलेले होते. मात्र ते शब्द लोकसभा झाल्यानंतर सर्वजण विसरून त्यांनी शब्दाचा खेळ केलेला आहे. त्यातच पक्षाचे नुकसान झालेले आहे.
मात्र याबाबत त्यावेळीही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे तक्रारी करण्यात आलेल्या होत्या. मात्र त्यावर काहीच कारवाई झालेली नाही. आता जर पुन्हा तसे झाले तर आम्ही काय करायचे असा प्रश्न अऩेकांपुढे उभा राहिलेला आहे. त्यामुळे प्रत्येकजण सावध पावले टाकत असून कोणाच्या शब्दाला किमत द्यायची याचा विचार करीत आहे.
नाराजांची नाराजीचा फटका सध्या तरी पक्षाला बसत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे भाजपमधील नाराजांचा गट नसून महायुतीतील सर्वच पक्षातील काही प्रमुख नेते व कार्यकर्ते नाराज आहेत. त्याचा मोठा फटका या वेळी बसणार असल्याचे दिसून येत आहे. आता सोमवारी अर्ज भरला जाणार असून प्रचाराची रणधुमाळी जोमाने सुरु होणार आहे.
मात्र नाराजांची नाराजी कशी दूर केली जाणार हा प्रश्न आता भाजप कार्यकर्त्यांना पडलेला आहे. मोदींचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक जागा महत्वाची आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यानी लक्ष देणे गरजेचे आहे. नाही. तर ऐनवेळी भाकरी फिरवावी, अशी अपेक्षा भाजपमधील कार्यकर्त्य़ांमधून व्यक्त केली जात आहे.
Post a Comment