नगर ः उद्धव ठाकरे याचं मानसिक संतुलन ढासळल आहे. ते बेताल विधान करत आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णय योग्य आहे. हे कायद्याचे राज्य आहे, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून तयार करण्यात आलेल्या प्रचार गीतावरून निवडणूक आयोगाने नोटीस दिली आहे. गाण्यातील ‘जय भवानी’ शब्द हटवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. याला उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
निवडणूक आयोगासोबत भाजपवर ठाकरेंनी टीका केली. ही हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असून आम्ही ते सहन करणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र आता यावरून राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखेंनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे.
Post a Comment