नगर ः नगर शहर व परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच ठऱलेली आहे. मात्र सोमवार (ता. 22) नगरकरांच्या कायमच लक्षात राहिल, अशी वाहतुकीची कोंडी झाली होती. तसेच शहरातील काही रस्ते अचानक वाहतुकीस बंद ठेवल्याने नगरकरांना त्याचा मनस्ताप सहन करावा लागला आहे. यामुळे चाकरमान्यांना मात्र कामावर जाण्यास उशीर झाल्याने अनेकांची एक दिवसाची अर्धी राज वाया गेलेली आहे.
विशेष करून शहरात लग्नसराईत तर नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. विशेष म्हणजे या कोडीतच नगरकारंना कर्कशआवाजीत डीजेचा गोंगाट सहन करावा लागत आहे. या डीजेच्या तालावर तरुणाई बेधूंद होऊन नाचत असते. त्यामुळे अऩेकदा तर वाहतुकीची कोंडी होती होत असते. त्याचा मनस्ताप सर्वसामान्यांना सहन करावा लागत आहे.
सोमवारीही त्या कार्यक्रमामुळे वाहतुकीची कोंडी सकाळी आठ वाजल्यापासून होत होती. दुपारी पाच वाजेपर्यंत शहरात वाहतुकीची कोंडीचा मनस्ताप सहन करावा लागला. शहरात अचानक एव्हढा मोठ्या संख्येने लोक येणार असल्याची माहिती झाल्यानंतर प्रशासनाने कोणते रस्ते खुले राहणार, कोणते बंद रहाणार याची माहिती नागरिकांपर्यंत समाज माध्यमासह दैनिकांम|धून देणे गरजेचे होते. मात्र तसे प्रयत्न प्रशासनाने केलेले दिसून येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Post a Comment