अहिल्यानगर : राज्य पातळीवर कार्यरत असलेल्या त्या शिक्षक संघटनेत पुन्हा नाराजी नाट्य सुरू झालेले आहे. या विषयी शिक्षकांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.
राज्य पातळीवरील त्या संघटनेत काही दिवसांपूर्वी बदल करण्यात आलेले आहेत. हे बदल काहींना न पटणारे होते. त्यावेळी काहींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर ते अलिप्त राहत होते. ही बाब जिल्ह्यातील नेत्यांच्या लक्षात आली.
त्यानंतर त्यांनी नाराजांशी चर्चा करून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनीही संबंधितांशी चर्चा करून नाराजी दूर केली होती.परंतु ही नाराजी वरवर दूर झालेली होती, अशी चर्चा शिक्षकांमध्ये सुरू आहे.
आता पुन्हा त्या नाराजांची नाराजी उफाळून आल्याची चर्चा शिक्षकांमध्ये आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नेते नाराजांची नाराजी कशी दूर करतात याकडे सर्वांचे लक्ष लाले आहे.
Post a Comment