कर्जतमधील अविश्वास ठरावाचा वाद न्यायालयात जाणार

कर्जत ः राज्यातील राजकारणात अनेक नाट्यमय घडमोडी मागील अडीच वर्षांपूर्वी घडलेल्या आहेत. या नाट्यमय घडमोडींचा वाद अद्यापही न्यायालयात प्रलंबित असून तसाच काहीसा वाद आता कर्जत तालुक्यात झालेला आहे. दोन गटनेतेपदाा तिढा आता समोर आलेला आहे. त्यामुळे नगरसेवकांसाठी कोणाचा व्हीप महत्त्वाचा राहिल, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


राज्यात महाविकास आघाडीला सरकारला भाजपने खिंडार पाडलेले आहे. त्यावेळी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्यासह काही नगरसेवक पक्षातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी थेट पक्षावरच दावा केला. त्यावेळीही गटनेतेपदाचा वाद चव्हाट्यावर आला होता. 

त्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसमधूनही अजित पवार यांचा गट बाहेर पडला होता. त्यावेळीही दोन गटनेते पदाचा वाद झाला होता. तशीच काहीशी परिस्थिती आता कर्जत नगरपंचायतच्या राजकारणात आलेली आहे. यामुळे कर्जत तालुक्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले आहे. 

कर्जत नगरपंचायतीमध्ये संतोष मेहत्रे हे गटनेते यापूर्वी सर्व 15 नगरसेवकांच्या एकत्रित गटाचे गटनेते म्हणून निवडण्यात आले होते. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष यांनी कर्जत नगरपंचायत च्या गटनेतेपदी अमृत काळदाते यांची निवड जाहीर केली आहे.
 
तसे पत्र देखील जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. यामुळे आता दोन गटनेते झाले आहेत. यामुळे कोणाचा आदेश कायदेशीर मानला जाणार आहे,. हा प्रश्न आता निर्माण झाला आहे. त्यायातच उषा राऊत यांनी आता नगराध्यक्षपदाचा  राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे नवीन ट्विस्ट आलेला आहे. 

राऊत यांनी आपली भूमिका जाहीर केलेली असली तरी त्यांनी अनेक गोष्टी अद्याप स्पष्ट केलेल्या नाहीत. त्यामुळे येथील नगराध्यक्षपदाचा वाद न्यायालयात जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post