पुणे :देहूमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंगरक्षकांना संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे यांनी मारहाण केली आहे.
संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या प्रस्थान सोहळ्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दर्शन घेऊन बाहेर जात असतानाच ही घटना घडली आहे. प्रचंड गर्दीत फडणवीसांचे अंगरक्षक त्यांच्या मागे चालत होते. याच वेळी भावार्थ देखणे या फडणवीसांच्या अंगरक्षकांनाच मारहाण करण्यात आली.
दुसरीकडे आळंदी संस्थानचे विश्वस्त योगेश्री निरंजननाथ यांनी सुद्धा पुण्यामध्ये माध्यमांच्या प्रतिनिधीसोबत आणि कर्तव्यावर असलेल्या पोलिसांसोबत अरेरावी केली आहे.
पुण्यातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये पालखी मुक्कामी असतानाच निरंजननाथ यांनी माध्यप्रतिनिधींना अडवण्याचा प्रयत्न करत केला आहे. देवाचे सेवेकरी देवाचे मालक झाल्यासारखे वागत असल्यामुळे आता सर्व स्तरातून टीका होऊ लागली आहे.
या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी राज्यभरातून होत आहे. यापुढे परत असे प्रकार होणार नाही. क्षासाठी आताच कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे. आता सरकार काय भूमिका घेते हे पहावे लागेल.
Post a Comment