कंपनी सुरू करण्यासाठी ३० लाख आणावे म्हणून विवाहितेचा छळ...

अहिल्यानगर: वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येचे प्रकरण गाजत असतानाच रोजच नवीन विवाहितेची खेळाच्या घटना आता समोर येऊ लागल्या आहेत.  या तक्रारी दाखल होत असल्या तरी त्यांचा तपास वेगाने होत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.


नवीन कंपनी सुरू करण्यासाठी ३० लाख रुपये आणण्याची मागणी करत पुण्यात एका महिलेचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सहा जणांविरोधात तोफखाना पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल झाला आहे.

पती विक्रांत श्रीकांत जोशी, अनिता श्रीकांत जोशी, श्रीकांत गोविंदराव जोशी, तुषार श्रीकांत जोशी, अनघा तुषार जोशी (सर्व रा. कपीलअखाली सोसायटी, पॅनकार्ड क्बल रोड, बानेर, पुणे), पल्लवी सत्यजित कुलकर्णी (रा. गांधीनगर, गुजरात) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

तनुजा विक्रांत जोशी (वय ३३, रा. मुळ रा. पॅनकार्ड क्बल रोड, बानेर, पुणे, हल्ली अहिल्यानगर) असे छळ झालेल्या विवाहितेचे नाव आहे. त्यांचा २०२१ मध्ये विक्रांत श्रीकांत जोशी यांच्याशी विवाह झाला.

लग्नानंतर कंपनी टाकण्यासाठी माहेरुन ३० लाख रुपये अशी मागणी करता सासरच्यांनी विवाहितेचा छळ करत होते. दोन्ही बाजुच्या नातेवाईकांची बैठकही झाली. मात्र तरीही पतीने नांदायला नकार दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post