कांद्याच्या भावात वाढ... उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण

अहिल्यानगर : अवकाळी पावसाने मे महिन्यात जिल्ह्यात सर्वदूर दमदार हजेरी लावलेली आहे. या पावसात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. 


कांदा पिकाचेही यामध्ये मोठे नुकसान झालेले आहे. तसेच कांद्याची आवकही कमी होत असल्याने कांद्याच्या भावात वाढ झालेली आहे. बाहेरील राज्यातून सध्या कांद्याला मागणी वाढलेली आहे.

नेप्ती उपबाजार समितीत कांद्याच्या ५३ हजार ३१७ गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला १ हजार ९५० रुपयांचा भाव मिळाला. लिंबाचे प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः १६०० ते १९५०, दोन नंबर कांदा ः १२०० ते १६००, तीन नंबर कांदा ः ६०० ते १२००, चार नंबर चांदा ः) २५० ते ६००.  

वांबोरी उपबाजार समितीत कांद्याच्या  ९ हजार ७६९ कांदा गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला १९०० रुपयांचा भाव मिळाला. कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः १५०५ ते १९००, दोन नंबर कांदा ः १००५ ते १५००, तीन नंबर कांदा ः १०० ते १०००, गोल्टी कांदा ः ८०० ते १३००.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post