श्रीगोंदा : तालुक्यात अनेक राजकीय घडामोडी आता सध्या घडत आहेत. माजी आमदार राहुल जगताप यांनी शरद पवार गटाला जय महाराष्ट्र करून अजित पवार गटात दाखल झालेले आहे.
नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे व जगताप यांनीएकाच वेळी अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे. त्यामुळे श्रीगोंद्यात आता अजित पवार गटाची ताकद वाढलेली आहे. त्यामुळे अजित पवार गट स्वबळावर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे.
युती ऐवजी आता पक्षाने स्वबळावर लढवावे, अशी अपेक्षा अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत डाॅ. प्रणिता जगताप यांनी उमेदवारी करावी, अशी अपेक्षा अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. यामुळे तालुक्यातील विकास कामे होण्यास मदत मिळणार आहे.
यासाठी आता राहुल जगताप यांनी निर्णय घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांमधून होत आहे. राहुल जगताप आमदार असताना तालुक्यात अनेक विकास कामे झालेली आहेत. सध्या कामे होत असली तरी ती तूरळ असल्याने नागरिकांमध्ये नाराजीची भावना आहे.
राहुल जगताप जिल्हा परिषद सदस्य असताना त्यांनी स्वतःच्या गटाबरोबर तालुक्यातही मोठ्या प्रमाणात कामे केलेली आहे. त्यानंतर आमदार झाल्यानंतर तालुक्यात विकास कामांची गंगाच वाहिली होती. आता पुन्हा जगताप यांची सत्ता यायची असेल तर आता डाॅ. प्रणिती जगताप यांना जिल्हा परिषद सदस्य होणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.
अजूनही गटांची आरक्षण सोडत होणे बाकी आहे. ती झाल्यानंतरच जगताप कोणत्या गटाचे नेतृत्व करणार हे स्पष्ट होणार आहे.
Post a Comment