जनता दरबारातील प्रश्न मार्गी लागले का.... नागरिकांचा सवाल..

अहिल्यानगर ः जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सध्या जनता दरबार भरविले जात आहेत.या जनता दरबारात नागरिक आपले प्रश्न पोटतिडकीने मांडत आहे. ते सोडविण्याचे लोकप्रतिनिधी आश्वासनही देत आहे. मात्र महिनोंमहिने ते प्रश्न कायम रहात आहेत. त्यामुळे जनता दरबार हे फक्त प्रसिध्दीसाठी घेतले जात असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे.


जनता दरबार भरवून जनतेचे प्रश्न सोडविले जात असल्याचे नेते मंडळींकडून भासविले जात आहे. हे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकारीही उपस्थित असतात. त्यांना सज्जड शब्दात अधिकारी झाडाझडती घेत असतात. परंतु प्रश्न कायम तसेच राहत आहेत. त्यामुळे जनता दरबार नेमका कशासाठी आयोजित केले जातात, यावर सध्या चर्चेचा खल रंगत आहे. 

जनता दरबारामध्ये नेत्यांचेच कार्यकर्ते उपस्थित राहत आहेत. तेच आपले प्रश्न मांडत आहे. हा जनता दरबार म्हणजे अधिकाऱ्यांची झाडझडतीसाठी आयोजित केले जात आहे, अशीही चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे. कारण जिल्ह्यातील होणाऱ्या जनता दरबारात आज अखेर किती प्रश्न मांडले गेले व किती ते मार्गी लागले, याचा आढावा आता नेत्यांनी घेऊन त्याची प्रसिध्दी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. 

आगामी काळात नेत्यांनी जनतादरबार घेतल्यानंतर त्या दरबारात कोणत्या व किती विभागाचे तक्रारी आल्या होत्या. किती तक्रारी मागील जनता दरबारात होत्या. त्या किती निकाली लागल्या याचा लेखाजोखा प्रत्येक लोकप्रतिनिधीने मीडियासमोर मांडावा, अशी मागणी आता जोर धरत आहे. राजकारणासाठी जनता दरबार भरवून नागरिकांच्या भावनांशी खेळू नये, अशी मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post