अहिल्यानगर ः आमदार संग्राम जगताप यांनी हिंदूत्वाचा मुद्दा लावून धरलेला आहे. यावरून ते आंदोलनात सहभाग घेत आहे. परंतु त्यांची भाषणे आता तीव्र होत चालेली आहे. याचा फटका राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाला बसणार आहे. त्यामुळे त्यांना सावरावे, अशी अपेक्षा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केली आहे.
एकीकडे धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून आपण पुढे जात असताना एखाद्या धर्माबाबत वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह विधान पक्षातील आमदाराने करणे पक्षाला परवडणारे नाही. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत.
या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काॅंग्रसेची पिछेहाट होऊ शकते. त्यामुळे आमदार जगताप यांना समज द्यावी, अशी मागणी पक्षातून होत आहे. आता अजित पवार काय भूमिका घेतात व जगताप त्यावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment