नीतेश राणेंवर ठाकरेंची टीकास्त्र

मुंबई ः  उंची पेग्विनची, चाल बदकाची आणि आवाज कोंबडीचा, डोळे कुणासारखे ते माहिती नाही. अरे तुझा जीव किती, तू बोलतो किती? तुझ्या वडिलांची पार्श्वभूमी काय? एक कुणीतरी बाप ठरवं आणि मग बोल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपचे आमदार नीतेश राणे यांच्यावर टीका केली.


शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिनाचा सोहळा षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला.  
ठाकरे म्हणाले, कार्यकर्त्यांच्या आणि राज्याच्या मनात जे आहे, तेच मी करणार. पण हे होऊ नये म्हणून यांच्या मालकाचे लोक इकडे तिकडे, हॉटेलमध्ये भेटी घेत आहेत. 

मुंबई पुन्हा मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर यांच्या मालकाचे काय होणार? मुंबईत मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून हे प्रयत्न करत आहेत. मुंबई आम्हचीच. ठाकरे ब्रँड संपवायला गेला तर तुमचे नामोनिशाण ठेवणार नाही. 

आतापर्यंत त्यांनी जे वादे केले होते ते फसवे केले होते. निवडणुकीत त्यांनी जनतेशी वादा यांनी पाळला नाही. मग मला केलेला वादा, अडीच वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा तो तरी यांनी कसा पाळला असता.

हे पणवती सरकार आहे. आम्ही इंडिया आघाडी स्थापन केली त्यावेळी इंडियन मुजाहिद्दीन सोबत तुलना करताना तुम्हाला लाज वाटली नाही. देशद्रोह्यांसोबत आमची तुलना करता आणि तुम्ही काय केले ते सांगायला आमचेच खासदार जगभर पाठवता, असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post