मुंबई : राज्यातून ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण तो संपणार नाही. ठाकरे यांना संपवायला निघालेल्यांचे नामोनिशाणही ठेवणार नाही, असा सज्जड इशारा उद्धव ठाकरे यांनी आज दिला.
शिवसेना ठाकरे गटाचा वर्धापन दिनाचा सोहळा षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. यावेळी त्यांनी हा इशारा दिला. मुंबई यांच्या मालकाच्या घशात घालण्यासाठी भाजप मराठी माणसाला एकत्र येऊ देत नाही. पण राज्याच्या मनात जे आहे, तेच मी करणार आहे, असे ते म्हणाले. शिवसेना अजूनही तरुण आहे.
अजून ही तरुणच राहणार आहे. तिकडे चोरांचा बाजार भरला होता. पहिल्या मेळाव्याच्या वेळी बाळासाहेब यांनी शिवाजी पार्कमध्ये मेळावा घेतला होता. त्यावेळी मी माझ्या माँच्या मांडीवर बसलो होतो. राजकारणात ज्यांना पोरं होतं नाहीत ते आमच्यावर टीका करतात. तुला पोर होत नाहीत.
त्याला आम्ही काय करू? किती पाहिजे आहेत तेवढी पोर घे. भाजपला स्वतःची पोरं नाहीत. त्यामुळे त्यांना अशी घ्यावी लागतात. ते आपल्याला हिंदुत्व शिकवत आहेत, असे ते म्हणाले.
एवढी माणसं चोरली, पक्ष चोरला, वडील चोरले तरी उद्धव ठाकरे संपत कसा नाही? असा प्रश्न त्यांना पडला असेल. पण शिवसैनिकांनी रक्त आटवून ही शिवसेना उभारली आहे. पैसे फेकून नव्हे तर कष्ट करून ही संपत्ती जमवली आहे. दुसरीकडे चोरांचा बाजार सुरू आहे, असे ते म्हणाले.
Post a Comment