विखेंनी लक्ष घातले तरच निवडणूक चुरशीची होणार... नाही तर कारखान्यासारखीच अवस्था होणार.. संगमनेरमध्ये चर्चेला उधाण...

संगमनेर ः विधानसभा निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा पराभव करून अमोल खताळ विजयी झालेले आहे. तेव्हापासून संगमनेर तालुक्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रथम होत आहे. त्यामुळे या निवडणुका चुरशीच्या होतील, असे बोलले जात असले तरी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी लक्ष घातले तरच होतील, नाही तर संगमनेर कारखान्यासारखी अवस्था होईल, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post