कोपरगाव : गोदावरी व्या-उजव्या कालव्यातून पाण्याचे आवर्तन शनिवारपासून सुटणार आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोपरगाव तालुक्यातील सर्वच पिकांना पाण्याची आवश्यकता असल्यामुळे लाभधारक शेतकऱ्यांना आवर्तनाची आस लागली होती. कायम अडचणीत असलेला शेतकरी आलेल्या संकटाला तोंड देऊन पुढे चालत असतो.
यावर्षी शेतकऱ्यांनी प्रतिकूल परिस्थितीत शेतात रब्बी हंगामाची पिके उभी केली. बहुतांशी पिके शेवटच्या पाण्यावर असून या पिकांना वेळेवर पाणी उपलब्ध होऊन पिकांना पाण्याची टंचाई झळ बसू नये व शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पाटबंधारे विभागाला गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याला तातडीने आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.
या मागणीप्रमाणे पाटबंधारे विभागाने २० फेब्रुवारीपासून गोदावरीच्या उजव्या व डाव्या कालव्याला आवर्तन सोडण्याचे नियोजन केले आहे. या आवर्तनासाठी आमदार आशुतोष काळे यांनी पाठपुरावा केल्यामुळे आवर्तन सुटणार आहे.

Post a Comment