कर्जत ः महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रासह तालुक्यातील पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून द्यावी.अशी मागणी भाजपा जिल्हा किसान मोर्चाचे सरचिटणीस सुनील यादव यांनी केली आहे.
महाविकास आघाडी सरकारने जसे आरोग्य, पोलिस, प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्राधान्याने कोरोना प्रतिबंधक लस उपल्बध करून दिली
आहे. तशी लोकशाहीचा चौथा स्तंभ असणाऱ्या आणि अशा महामारीच्या काळात
पत्रकार आपल्या पर्यंत वस्तुनिष्ठ बातम्या पोहचविण्यासाठी अहोरात्र फिरतात.
त्यांना सुद्धा फ्रंटलाईन वर्कर म्हणून समावेश करून महाराष्ट्रासह कर्जत
तालुक्यातील तमाम पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांना प्राधान्याने कोरोना
प्रतिबंधक लस उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती आम्ही सरकारला करीत असल्याचे
भाजपा जिल्हा किसान मोर्चाचे सरचिटणीस सुनील यादव यांनी केली आहे.
Post a Comment