पाथर्डी : कोरोना साथ रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य तिसरी लाट थोपवण्यासाठी जिल्हा प्रशासनाला विशेष दक्षता घेण्याचे आदेश दिले. सामाजिक अंतर राखण्याचे भान खुद्द एका वरिष्ठ अधिकार्याला राहिले नाही. कार्यालयाच्या आवारातच त्यांनी भालगाव येथील ग्रामस्थांनी संवाद साधला.
शहर व तालुक्यात रुग्ण संख्या आटोक्यात आल्याने तालुक्यातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले. कोरोना पूर्वी उपजिल्हा रुग्णालयापासून जुना बस स्थानकापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा बाजार भरत नव्हता. शासनाने निर्बंध हटविले तर फेरीवाल्यांनी सर्व रस्ता व्यापून टाकला. याकडे महसूल व पालिका प्रशासनाचे लक्ष नाही.
तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस मुद्रांक विक्रेत्यांच्या परिसरातही बाजार सारखी गर्दी असते. त्यातच भर म्हणून प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात ही मोठी गर्दी जमून अधिकारी सुद्धा त्यांच्या अडचणी समजावून घेतात. सामाजिक आंतर,मास्कचा वापर याकडे लक्ष देण्यासाठी याच अधिकाऱ्यांचे पथक गावभर फिरत कारवाई करते. काही उत्साही अधिकारी हातात दंडुका घेऊन फिरतात.
व्यापाऱ्यांना कारवाईचा बडगा मात्र गर्दी करण्यास कारणीभूत ठरणाऱ्या फेरीवाल्यांना अभय दिले जाते. दुकानदाराला समोर हातगाड्या, पथारी मांडून बसलेल्यांमुळे दुकानदारावर माशा मारत बसण्याची वेळ आली आहे.
सरकारी कार्यालयांमधील गर्दी हटत नसेल तर पथकाने रस्त्यावर थांबून तपासणी करण्यापेक्षा शासकीय कार्यालयात गर्दी करणाऱ्यांची तपासणी मोहीम हाती घेण्याची लोकांची मागणी आहे. प्रशासनाच्या विविध विभागातील विसंवाद हाच शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
Post a Comment