बार्शीहून चारचाकी भाड्याने आणून राहुरीत चालकाला लुटले...


राहुरी : बार्शी येथून राहुरी येथे भाडे घेऊन आलेल्या चारचाकी वाहन चालकाला तीन चोरट्यांनी मारहाण केली. तसेच त्याच्या ताब्यातील सियाज कंपनीची चारचाकी व एक हजार रोख असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल घेऊन लुटारूंनी लुटले.  ही घटना २६ जून रोजी मध्यरात्री घडली. 

राहुरी शहरातील प्रतिष्ठित व्यापारी संतोषकुमार लोढा यांचे व्याही अतुल माणिकचंद राठोड हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे रहिवाशी आहेत. त्यांच्याकडे एम एच १३ बी एन ६३५५ क्रमांकाची सियाज कंपनीची चारचाकी कार आहे. 

त्या चारचाकीवर नवाब मोहम्मद पठाण (रा./ बार्शी) हे चालक म्हणून काम करतो.  २६ जूनला सायंकाळी पाच वाजे दरम्यान बार्शी बस स्थानक परिसरात तिघेजण राहुरीकडे येण्यासाठी वाहन शोधत होते. त्यावेळी त्यांनी तेथील एका रिक्षा चालकाला चौकशी केली. त्या रिक्षा चालकाने नवाब पठाण याला बोलावून घेतले. 

राहुरी येथे एका महिला रुग्णालाला घेऊन यायचे असे सांगून त्यांनी ११ रूपये किलो मीटर प्रमाणे नवाब पठाण याच्या ताब्यातील सियाज गाडी भाडोत्री घेतली. 

सायंकाळी तेथून निघाल्यावर रात्री बारा वाजे दरम्यान ते राहुरी येथे आले. या चोरट्यांनी चालकाला गाडी मल्हारवाडी रोडकडे घेण्यास सांगितले. 

दरम्यान घोरपडवाडी येथील म्हसोबा मंदिर परिसरात गेल्यावर त्या तिघांनी नवाब पठाण या चालकाला मारहाण करून त्याला रूमाल व चार्जरच्या केबलने झाडाला बांधून ठेवले. 

त्यांच्या जवळील एक हजार रोख व चारचाकी असा सुमारे १० लाखांचा मुद्देमाल घेऊन भामटे पसार झाले. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास पोलिसांनी तपास सुरु केला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post