नगर : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर मागील संपूर्ण वर्ष वाया गेलेले आहे. यंदाचे नवीन शैक्षणिक वर्षासाठी उपस्थिती बाबतचा आदेश नुकताच शिक्षण संचालक द. गो. जगताप यांनी काढला आहे.
याबाबत राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष 2021 -22 सुरू करताना पाळावयाची नियमावली जारी केली आहे. यामध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता नववी, इयत्ता अकरावीचे 50 टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील, तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावी चे शंभर टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनाही शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य राहील असे म्हटले आहे.
या आदेशात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी 100 टक्के उपस्थित राहणे बाबत सूचित करण्यात आलेले आहे. मुंबई शहरातील शिक्षकांच्या शाळा कनिष्ठ महाविद्यालय उपस्थिती करता त्यांना लोकलद्वारे प्रवासाच्या सोयीबाबत शासन स्तरावरून संबंधित सूचना निर्गमित करण्यात करण्यात आल्या आहेत.
याबाबत सर्व क्षत्रिय यंत्रणांना निर्देश देण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शिक्षकांना 50 टक्के उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे अध्ययन- अध्यापन कार्य ऑनलाइनद्वारे करावे लागणार आहे. यासोबतच शाळा पूर्व तयारी तसेच तदनुषंगिक कामकाज पन्नास टक्के उपस्थिती वरच करावे लागणार आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेमध्ये शिक्षक व इतर जिल्हा परिषद कर्मचार्यांच्या मुख्यालय राहणे तसेच बॅक वसुली बाबतीत कठोर भूमिका घेतल्याने शिक्षक संघटना व इतर कर्मचारी संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
त्यातच शिक्षण संचालकांनी दिलेल्या पत्राचा जिल्हा परिषद प्रशासन व पदाधिकारी कसा अर्थ घेतात व ते प्रत्यक्ष कार्यवाही कशी होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Post a Comment