कर्जत ः कर्जत नगरपंचायत निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी राजकीय चर्चांना सध्या वेग आलेला आहे. कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विकास कामे मोठ्या प्रमाणात सुरु असले तरी नगर पंचायतमध्ये राष्ट्रवादीला सत्ता मिळविणे अवघड जाणार आहे. सध्या भाजपाचे पारडे कर्जत शहरात जड असल्याचे चित्र दिसून येत आहे. भाजपाच्या जोडीला आता विखेंची ताकद राहणार असल्यामुळे आता राष्ट्रवादीला आगामी नगरपंचायत निवडणूक शिवसेना व काॅंग्रेसलाबरोबर घेऊन लढवावी लागणार आहे.
कर्जत
नगर पंचायतमध्ये मागील वेळी भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले होते. मागील
निवडणुकीत भाजपाल बारा, काॅंग्रेसला चार व एक अपक्ष असे बलाबल होते.
राष्ट्रवादी व शिवसेनेला पहिल्याच नगर पंचायत निवडणुकीत खातेही उघडता आलेले
नाही. त्यानंतर झालेल्या कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी
काॅंग्रेसचे उमेदवार रोहित पवार विजयी झालेले आहे. मात्र कर्जत शहरावर
भाजपाची असलेली पकड अद्यापही कायम आहे.
कर्जत
नगरपंचायतच्या माध्यमातून पहिले नगराध्यक्ष नामदेवराव राऊत यांनी शहराचा
विकास केलेला आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात शहरात स्वच्छता मोहिम
राबविलेली आहे. त्याच बरोबर पिण्याचे पाणी, रस्ते आदी प्रश्न त्यांनी
मार्गी लावून जनतेच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केलेले आहे. राऊत
यांनी जनतेशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडीअडचणी नगराध्यक्ष व
उपनगराध्यक्ष काळात सोडविण्यावर भर दिलेला आहे. राष्ट्रवादीला
नगरपंचायत निवडणुकीत अपयश आलेले असले तरी मोजक्याच कार्यकर्ते व स्थानिक
नेत्यांकडून नागरिकांशी संपर्क ठेऊन त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यावर
भर दिलेला आहे.
रोहित पवार आमदार झाल्यापासून त्यांनी शहरावर पकड निर्माण
करण्यासाठी प्रयत्न सुरु केलेले आहे. त्यांच्याकडून तालुक्यासह शहरात विकास
कामे करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. त्यामुळे जनतेच्या मनात राष्ट्रवादीने
स्थान निर्माण केलेले असले तरी शहरातील नेत्यांकडून संपर्क अभियान वाढविणे
गरजेचे आहे.या उलट माजी नगराध्यक्ष नामदेवराव राऊत व त्यांच्या समर्थक व
इतर भाजपाच्या नेत्याकंडून प्रभागातील जनतेशी संपर्क राहून त्यांच्या अडचणी
सोडविण्यावर नेहमीच भर दिलेला जात आहे.
विधानसभा
निवडणुकीत आमदार राधाकृष्ण विखे यांनी आता भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे.
त्यामुळे काॅंग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे.
त्यामुळे कर्जतमधील भाजपाची ताकद वाढलेली आहे. त्याचा चांगला परिणाम कर्जत
नगर पंचायत निवडणुकीत भाजपाला होणार आहे. पूर्वीचे भाजापाचे व नव्याने
आलेले भाजपात आलेल्या कार्यकर्त्यांमुळे राष्ट्रवादीला नगर पंचायत
निवडणुकीत चांगले आवाहन उभे राहणार आहे.
मागील
निवडणुकीत राष्ट्रवादी व शिवसेनेला खाते उघडता आलेले नसले तरी शहरातील
त्यांची ताकद कमी झालेली नाही. आगामी निवडणुकीत भाजपाच्या ताब्यातून नगर
पंचायत मिळावयची असेल तर महाविकास आघाडीला ही निवडणूक एकत्र येऊ लढावी
लागणार आहे. अन्यथा भाजपाचे निर्वावाद वर्चस्व कायम राहणार आहे.
Post a Comment