कर्जत ः कर्जत नगर पंचायतची निवडणूक जाहीर झालेली नसली तरी सर्व पक्षांची मोर्चे बांधणी सध्या सुरु झालेली आहे. भाजपाचे पारडे कर्जत नगर पंचायत निवडणुकीत वरचढ राहणार असले तरी भाजपातील जुन्या व नव्यांचा मेळ घालताना नेत्यांची चांगलीच दमछाक होणार आहे. हा मेळ जमला नाही तर त्याचा फायदा राष्ट्रवादीला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजापाचे उमेदवार डाॅ. सुजय विखे विजयी झालेले आहेत. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत आमदार राधाकृष्ण विखे सुध्दा भाजपात दाखल झालेले आहे. खासदार डाॅ. सुजय विखे ते लोकसभा निवडणुकीच्या अगोदर भाजपमध्ये दाखल होऊन विजयी झालेले आहेत. त्यामुळे जुन्या व नव्यांचा अवमेळ झालेला होता.
मात्र डाॅ. विखे यांनी हा अवमेळचा मेळ घडवून आणून विजय मिळविलेला आहे. मात्र स्थानिक राजकारणात काॅंग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्यांना म्हणवा तितकेच स्थान मिळत नाही. त्यामुळे जुन्या व नव्यांमध्ये कायमच धूसफूस सुरु आहे.
विखे भाजपात दाखल झाल्यामुळे त्यांच्याबरोबर काॅंग्रेसचे अनेक कार्यकर्ते भाजपात दाखल झालेले आहे. परंतु अनेक वर्षे भाजपाबरोबर संघर्ष केलेल्या काॅग्रेसच्या नेत्यांचे व भाजपाच्या नेत्यांचे विचार जुळत नाही. त्यामुळे अंतर्गत संघर्ष कायम सुरु आहे.
जुने निष्ठावंत कार्यकर्ते व नेते नव्याने आलेल्यांना आपल्यात सामावून घेत नाही. तो मुद्दा कर्जत नगर पंचायत निवडणुकीत उपस्थित होण्याची शक्यता आहे. मागील पंचवर्षिक निवडणकीत भाजपाच्या विरोधी उभे ठाकलेले अनेकजण भाजपात आल्याने भाजपाची ताकद वाढण्याएेवजी आता डोकेदुखी ठरणार आहे.
भाजपाच्या निष्ठावंतांना तिकिटात डावलेले जाणार असल्याने अनेकजण अपक्ष काहीजण विरोधी पक्षात जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांना सर्वांचा मेळ घालूनच कर्जत नगर पंचायतची निवडणूक लढवावी लागणार आहे. भाजपातील अवमेळ जर थांबला नाही तर त्याचा फायदा राष्ट्रवादीला होऊन कर्जत नगर पंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकण्याची शक्यता आहे.
भाजपाचे नेते आता कार्यकर्त्यांची कशी मोठ बांधतात, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे. विरोधकांमध्ये असलेल्या अवमेळाचा मेळ घालून राष्ट्रवादी, शिवसेना कसा आपला फायदा करून घेतात, हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.
Post a Comment