पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज... अभय आव्हाड यांचे प्रतिपादन...


पाथर्डी :  वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. पर्यावरण संवर्धन होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले.   

बाबुजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित पर्यावरण सप्ताहानिमित्त राष्ट्रीय छात्र सेना कार्यक्रमात बोलत होते. 

यावेळी पाथर्डी नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदूशेठ शेळके, नगरसेवक बंडू बोरुडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. पी. ढाकणे, एनसीसी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. अजयकुमार पालवे आदी उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालय परिसरामध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमाचे १७ महाराष्ट्र बटालियन एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर कर्नल जीवन झेंडे, एडम ऑफिसर कर्नल विनय बाली व सुभेदार मेजर  लोकेंदरसिंग यांनी अभिनंदन केले.

आव्हाड म्हणाले की, वृक्षतोडीमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. निसर्गाचा समतोल ढासळत चालला आहे. त्यामुळे पर्यावरणचक्र विस्कळीत झाले आहे. मानवी आरोग्याबरोबरच सामाजिक समस्या निर्माण होत आहेत. 

या समस्या कमी करण्यासाठी राष्ट्रीय छात्र सेना विविध उपक्रमांच्या माध्यमातून सतत कार्यशील राहून सामाजिक बांधिलकी जपत आहे. पर्यावरण रक्षणासाठी मोलाचे योगदान देत आहे.यामुळे पर्यावरण संवर्धन होण्यास मदत होईल असे ते म्हणाले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post