मुंबई : राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाट ओसरत आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
राज्य शासनाने याबाबत एक शासन निर्णय जारी केला आहे. ग्रामीण भागात कोरोनामुक्त गावातील ग्रामपंचायतीने त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या गावातील इयत्ता आठवी ते इयत्ता बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबत पालकांशी चर्चा करुन ठराव करावा, असे त्यात आहे.
हे नियम पाळावे लागणार
शाळेत विद्यार्थ्यांना टप्याटप्याने बोलवण्यात येणार आहेत. कोविड संबंधी नियमांचे पालन करावे लागणार आहे. एक बाकावर एक विद्यार्थी बसवावे लागणार आहे.
दोन बाकांमध्ये सहा फूट अंतर ठेवणे आवश्यक आहे. एका वर्गात जास्तीत जास्त 15 ते 20 विद्यार्थी ठेवावे लागणार आहे. सतत हात साबणाने धुणे, मास्क घालणे हे नियम पाळवे लागणार आहेत. कोणतीही लक्षण आढळल्यास विद्यार्थ्यांना घरी पाठवून देऊन
त्यांची कोरोना चाचणी करावी लागणार आहे. संबंधित शाळेतील शिक्षकांची राहण्याची व्यवस्था त्याच गावात करावी किंवा त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था न वापरण्याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
एखाद्या शाळेत क्वारंटाईन सेंटर असल्यास स्थानिक प्रशासनाने ते इतर ठिकाणी स्थानापन्न करावे. स्थानिक प्रशासनाने अशा शाळेचे हस्तांतरण शाळा व्यवस्थापनाकडे करण्यापूर्वी त्याचे पूर्णत: निर्जंतुकीकरण करावे.
कोरोना संबंधी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी. शासनाने जारी केलेल्या कार्यपद्धतीचे काटेकोरपणान पालन करावे, असे निर्देश या आदेशात देण्यात आले आहे.
Post a Comment