नगर ः निवडणूक रिंगणात असलेल्या विरोधी पॅनलची अवस्था तर अतिशय केविलवाणी झाली आहे. त्यांनी अगोदर आमच्यातील तीन उमेदवार आयात केले. त्यानंतर जिल्हा परिषदेतील सेवेची फक्त दीड, दोन आणि अडीच वर्ष बाकी असलेल्या एक नव्हे तर चार जणांना उमेदवारी दिली आहे. जर कदाचित ते निवडून आले त्यांची सेवा संपल्यावर दोन आणि अडीच वर्षात पुन्हा पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. त्यामुळे मतदारांनी पाच वर्षांसाठी संचालक निवडावा, असे आवाहन जय श्री गणेश पॅनलचे प्रमुख संजय कडूस यांनी केले आहे.
जय श्री गणेश पॅनलच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते. यावेळी जय श्री गणेश पॅनलचे उमेदवार प्रशांत मोरे, विक्रम ससे, भाऊसाहेब चांदणे, राजू दिघे, डॉ.दिलीप डांगे, चंद्रकांत संसारे, ऋषिकेश बनकर, स्वप्निल शिंदे, ज्योती पवार, कल्याण मुटकुळे, सुधीर खेडकर, श्रीकांत देशमाने, काशिनाथ नरोडे, कैलास डावरे, योगेंद्र पालवे, अर्जुन मंडलिक, . सुरेखा महारनुर,.मनिषा साळवे आदी उपस्थित होते.
कडूस म्हणाले की, सहकार कायद्याच्या नियमातील तरतुदीनुसार आणि राज्य सहकारी प्राधिकरणने दि.२६ ऑक्टोबर २०१८ रोजी काढलेल्या परिपत्रकानुसार संचालक मंडळाच्या कार्यकाळात फक्त २ जागा संचालक मंडळ सभेत भरता येतात. त्यामुळे २ जागांसाठी पोटनिवडणूक अटळ आहे. त्यामुळे कमी सेवा राहिलेले ४ उमेदवार देवून विरोधी पॅनलने कोणते संस्था व सभासदहित पहिले? असा सवाल कडूस यांनी केला आहे.
कडूस म्हणाले की, आम्ही केलेल्या स्वच्छ व पारदर्शी कारभारामुळे जिल्हा भरात प्रचार दौऱ्यात सभासदांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे, शुक्रवारी (दि.१७) प्रचाराच्या शेवटच्या दिवशी संगमनेर व अकोले तालुक्यात झालेला दौरा आणि अकोले पंचायत समितीत झालेली सांगता सभा पाहता सभासद जय श्री गणेश पॅनलच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करतील असा विश्वास संजय कडूस यांनी व्यक्त केला.
Post a Comment