निघोज : पारनेर तालुक्यातील कुकडी डावा कालव्याचे पाणी गुरुवार (ता.१७)ला सकाळी अकरा वाजता पारनेर तालुक्यातील हद्दीत आल्याने कुकडी डावा कालवा लाभधारक परिसरातील शेतकऱ्यांनी व जनतेने आनंद व्यक्त केला आहे.
राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील , आमदार नीलेश लंके, कुकडी डावा कालवा नारायणगाव विभागाचे अधिकारी यांचे धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले आहेत.
गेली पंधरा दिवसांपुर्वी पारनेर तालुक्यातील कुकडी डावा कालवा लाभधारक परिसरात शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. मात्र कुकडी सल्लागार समीतीच्या बैठकीत कुकडीचे आवर्तन २५ ला सोडण्याच्या निर्णय घेण्यात आला होता.
यावेळी आमदार नीलेश लंके व सल्लागार समीतीचे सदस्य व माजी सभापती सुदाम पवार यांनी साधारण १० मार्च रोजी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्याची आग्रही मागणी केली होती.
शेतीच्या पाण्याचा प्रश्न पारनेर तालुक्यात गंभीर झाला असून लवकर पाणी न सोडल्यास शेतकऱ्यांना गहू, हरभरा कांदा ही पिके पाण्याअभावी जळून जातील.
शेतकर्यांची फार मोठी आर्थिक हानी होईल, असे सविस्तर सांगत जलसंपदा मंत्री जयंत पाटील व सल्लागार समीतीच्या सदस्यांचे लक्ष वेधले होते.मात्र यातील बहुतांश ईतर तालुक्याचे आमदार व सदस्यांनी हे आवर्तन एक एप्रिल नंतर सोडण्याची मागणी केली होती.
साधारण २५ एप्रिलला पाणी सोडण्याच्या निर्णय मंत्री पाटील व सदस्यांनी घेतली होती. हा निर्णय जाहीर झाल्यानंतर लाभक्षेत्रातील शेकडो शेतकऱ्यांचे शिष्टमंडळाने आमदार निलेश लंके यांचे लक्ष वेधीत कुकडीचे आवर्तन दि.१० ते १२ पर्यंत सोडण्यासाठी प्रयत्नशील राहणृयाची जोरदार मागणी केली होती.
आमदार लंके यांनी तातडीने मुंबईला जाऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन कुकडीचे आवर्तन लवकर सोडण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत मंत्री पाटील यांनी कुकडी सल्लागार समीतीच्या सदस्यांना फोनवर संपर्क करीत आमदार लंके यांची मागणी सांगीतली.
त्यानंतर सर्वाशी सविस्तर चर्चा झाल्यानंतर कुकडीचे आवर्तन १७ मार्चला सोडण्याच्या निर्णय जाहीर करण्यात आला. त्याप्रमाणे १७ मार्चला हे पाणी सकाळी ११ वाजता पारनेर तालुक्यातील हद्दीत आल्याने लाभधारक शेतकरी व जनतेने आनंद व्यक्त करीत राज्य सरकार, पाटबंधारे विभाग व आमदार नीलेश लंके यांचे धन्यवाद व्यक्त करीत आभार मानले आहेत.
गेली तीन आठवड्यापासून लाभधारक परिसरात शेतीच्या व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली होती. काही भागात पाणी होते तर काही भागातील विहीरी खोल गेल्या होत्या.
गहू, हरभरा, कांदा या पिकांना पाण्याची आवश्यकता भासत होती. २५ मार्चला सर्वच लाभधारक परिसरातील पिके जळून गेली असती. बरोबर वेळेला पाणी आल्याने या पिकांना जिवदान मिळाले आहे.
तसेच जनावरांच्या खाद्यासाठी कडवाळ, घास, मका व हिरवा चारा यांना सुद्धा फार मोठा आधार मिळाला आहे.या परिसरातील विहिरी खोल गेल्याने गेली चार आठ दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली होती.
हेच आवर्तन जर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आले असते तर कुकडी पट्याचे वाळवंट झाले असते.मात्र आमदार नीलेश लंके यांनी वेगाने सुत्र हलवले पाण्यासाठी तीन दिवस जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे जोरदार पाठपुरावा केला व १७ मार्चचा लाभधारक निर्णय घेतला गेल्याने शेतकऱ्यांसहीत जनतेलाही या आवर्तनाचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.
एप्रिल महिन्यात यात्रा जत्रांचा हंगाम सुरू होत असल्याने व गेली दोन वर्षे कोरोनामुळे सरकारने यात्रा जत्रांवर निर्बंध आणल्याने यावर्षीच्या यात्रा जत्रांना लाखोंच्या संख्येने गर्दी होणार आहे.
हे आवर्तन ३८ ते ४० दिवसांचे असल्याने या पाण्याचा फायदा साधारण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होउ शकतो अशाप्रकारे शेती असो किंवा पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर हे आवर्तन एक रामबाण उपाय असल्याने जनतेने आनंद व्यक्त केला आहे.
सुरुवातीला हे आवर्तन ५०० क्यसेसने सोडण्यात आले आहे.बाराच्या दरम्यान हे आवर्तन एक हजार क्युसेसने सोडण्यात येणार आहे. 17 मार्चला सायंकाळी १४०० क्यूसेसने सोडण्यात येणार आहे. अशाप्रकारे पारनेर तालुक्यातील लाभधारक शेतकऱ्यांना या आवर्तनाचा मोठा लाभ मिळणार आहे.
Post a Comment