विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी उन्हाळ्यात शाळा भरवा... पालकांची मागणी...

नगर : उन्हाळ्याच्या सुट्टीत जिल्हा परिषदेच्या शाळा भरविण्याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीने घेतलेला निर्णय सुत्य असून त्याचे अनुकरण जिल्हाभर होणे गरजेचे आहे.


कोवीड काळात शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुशेष भरुन काढण्यासाठी उन्हाळयाच्या सुटटीत शाळा भरविण्याबाबत प्राप्त मागणी करण्यात आली. त्यानुसार शिक्षण समितीच्या सभेत तसा ठराव करण्यात आला आहे.

या ठरावावर आता जिल्ह्यात अंमलबजावणी होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळा भरल्यास त्याचा चांगला परिणाम होणार आहे. विद्यार्थ्यांची प्रगतीत सुधारणा होणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या या निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.

या निर्णयानुसार जिल्ह्यातील काही शिक्षक सुट्टीचे अध्यापन करण्यास तयार आहे. काहींचा विरोध आहे. पण ही योजना चांगली आहे. त्याची अंमलबजावणी काटेकोर होणे गरजेचे आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post