अमर छत्तीसे
श्रीगोंदा : कांद्याच्या भावात वाढ झाल्यानंतर कांद्याला पर्याय शोधून ते वापरले जातात. मात्र लांबीला तसा पर्याय शोधला तरी सापडलेला नाही. त्यामुळे भाव वाढूनही लिंबाची खरेदी तेव्हढीच होत असते. त्यामुळे लिंबू उत्पादकांनी मालाची प्रतवारी करून लिंबू विक्रीस आणावे, असे आवाहन केले जात आहे.
जिल्ह्यात श्रीगोंदा तालुक्यात लिंबाचे मोठे उत्पादन घेतले जात आहे. सध्या लिंबाला चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी खूश झालेला आहे. मात्र भाव मिळत असल्याने काहीजण कच्चे लिंबू तोडून विक्रीस आणू लागले आहे. त्याचा परिणाम भावावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कांद्याला मागणी वाढल्यानंतर अनेकजण कवळी कांदा विक्रीस आणून विक्री करून फायदा घेण्याचा प्रयत्न करीत असतात. मात्र त्याचा संबंधित शेतकर्यासह इतरांनाही फटका बसतो. त्यामुळे आता तशी परिस्थिती लिंबाच्या बाबतीत व्हायला नको म्हणून शेतकरी प्रयत्न करीत आहे.
कांद्याला भोपळा, कांद्याची पात, कोबी, किसके, पालक आदी पर्याय आहेत. परंतु लिंबाला तसा पर्याय उपलब्ध नाही. त्यामुळे शेतकर्यांनी चिंता करायची गरज नाही. टप्याटप्याने माल विक्रीस आणल्यास ही दरवाढ कायम राहून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
लिंबू पाणी व उसाच्या रसात लिंबाची आवश्यकता कायम असते. याबरोबर जेवणातही लिंबाची गरज भागते. त्याला पर्याय इतर कोणताही नाही. त्यामुळे सध्या लिंबूचा तेजीत आहे.
Post a Comment