नवी दिल्ली : सध्याची परिस्थिती पाहता केवळ निवडणुकाच इंधन दरवाढ रोखू शकतात. पेट्रोल, डिझेल, एलपीजीचे भाव वाढू नयेत, म्हणून दर महिन्याला निवडणुका घ्या, असा टोला त्यांनी मोदी सरकारला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.
सलग दोन दिवस देशभरात पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. इंधन दरात पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुका संपल्यापासून वाढ होण्यास सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान या इंधन दरवाढीवरून राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे.
बुधवारी लोकसभेत सुप्रिया सुळे म्हणाल्या की, पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका जेव्हापर्यंत झाल्या नव्हत्या, तोपर्यंत इंधनाचे स्थिर होते. पण निकाल लागताच दरवाढ सुरू झाल्याची टीका विरोधकांकडून केंद्र सरकारवर होत आहे. मंगळवारी तर गॅस सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले आहेत.
दरम्यान, विरोधी पक्षांनी मंगळवारी या इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ लोकसभेतून सभात्याग केला. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत इंधनाचे वाढलेले दर मागे घेण्याची मागणी करत सभागृहावर बहिष्कार टाकला.
देशात ४ नोव्हेंबर २०२१ पासून इंधनदर स्थिर होते. पण अलिकडे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने तोटा भरून काढण्यासाठी देशात इंधनदरात प्रतिलिटर १५ ते २० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े.
Post a Comment