महागाईच्या भडक्यात कांदा घसरला....

नगर : युक्रेन-रशियाच्या युद्धामुळे सगळीकडे महागाईचा भडका उडाला असला तरी कांद्याचे भाव मात्र घसरले आहेत. त्यातच आयात-निर्यात धोरण व आंतरराष्ट्रीय घडामोडीमुळे कांद्याची निर्यात ही मंदावली असल्यानं कांद्याला उठाव नाही. 


कांदा लागवड ते साठवणूक, विक्री व्यवस्थापन यामध्ये उत्पादकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच वीज, पाणी, इंधन दरवाढ, खतांच्या वाढत जाणाऱ्या किंमती याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. 

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कांदा निर्यातीला प्रोत्साहन द्यावे,अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

ज्यावेळी देशातील कांद्याचे दर वाढतात, त्यावेळी सरकारकडून दर कमी करण्यासाठी हालचाली केल्या जातात. कांद्याच्या दरात घसरण होत असताना राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणत्याही हालचाल होत नाहीत.

त्यामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. युध्दाने सर्व गोष्टी महागल्या आहेत. मात्र कांदा स्वस्त झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post