वाटणी न होता कागदोपत्री दाखवली वाटणी... बोगस कागदपत्रांवर संस्थेकडून घेतले कर्ज...

पारनेर ः तालुक्यातील एका गावातील एकाने वाटणी न होताही वाटणी झाल्याचे कागदपत्रे तयार करून घेतले आहे. त्यानंतर त्याने एका संस्थेकडून कर्ज घेतल्याचा प्रकार घडला असून त्याची तालुक्यात सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 


पाच भावांचे एकत्र कुटुंब आहेत. नोकरी निमित्ताने तीन भाऊ तालुक्याच्या बाहेर पडलेले आहेत. तर दोन जणांचे कुटुंब गावात आहेत. कुटुंबिय कामानिमित्ताने व कार्यक्रम निमित्ताने गावाकडे येत असतात. 

अद्यापही सर्वजण एकत्र असून त्यांच्या जमिनीची वाटणी झालेली नाही. परंतु गावाकडे असलेल्या एका भावाच्या मुलाने जमिनींचे वाटप न होता, वाटप झालेल्याटची कादपत्रे तयार केलेली आहेत. 

या कागदपत्राच्या आधारे त्याने एका संस्थेकडून कर्ज घेतले आहे. हे कर्ज सात लाखाच्या आसपास आहेत. मात्र हे कर्ज घेताना त्याने तारण म्हणून ठेवलेली जमिनी त्याच्या मालकीची आहे की नाही, याची खात्री मात्र संबंधितांनी केलेली नाही. त्यामुळे हे प्रकरण संबंधित संस्थेच्या अंगलट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

हा सर्व प्रकार सर्व भावांच्या व त्यांच्या मुलांच्या लक्षात आलेला आहे. त्यामुळे हे प्रकरण न्यायालयात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post