अमर छत्तीसे
श्रीगोंदा : श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील वाघजाई चौकातून पाचवीतील विद्यार्थाला विना क्रमांकाच्या चार चाकी वाहणातून पळवून घेऊन चाललेल्या दोन जणांना आनंदवाडी येथील ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले.
याबाबत समजलेली माहिती अशी कि. आनंदवाडी येथील मुलगा हा काष्टी येथील विद्यालयात इयत्ता पाचवी मध्ये शिक्षण घेत आहे तो आज अकरा वाजेच्या दरम्यान काष्टी येथील वाघजाई चौकात आला असता एक विना क्रमांकाची चारचाकी स्विफ्ट गाडी आली. तुला वडिलांनी घरी बोलवले आहे, असे म्हणून गाडीत बसवले.
मात्र आनंदवाडी परिसरात गाडी आल्यावर आपल्याला उतरायचे आहे, असे सांगितले पण त्याला चाकूचा धाक दाखवून गप्प बसवले. गाडी आनंदवाडीच्या पुढे निघाली त्यावेळी समर्थने चालत्या गाडीचा दरवाजा उघडला उडी मारून आपली सुटका करून घेतली व आरडाओरडा केली.
त्यावेळी ते दोघे जण पळून जात असताना ग्रामस्थांनी सतर्कता दाखवून दोघांना गाडीसह ताब्यात घेतले. या गाडीत काष्टीतील पठाण नामक व्यक्तीसह पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क येथील वाळुंज नामक अशा दोन व्यक्तींना ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.
गेल्या तीन चार दिवसांपासून मुले पळवणारी टोळी सक्रीय असल्याबाबत सोशल मीडियावर संदेश फिरत होते. म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी एक पत्रक काढून अफवांवर विश्वास ठेवू नका संशयितांना पोलिसांच्या स्वाधीन करा. मारहाण करु नका असे आवाहन केले होते. पण आजच्या घटनेने एकप्रकारे पोलीस अधिक्षकांच्या आवाहनाला आव्हान दिल्याचे दिसते.
गाडीत वेगवेगळ्या क्रमांकाच्या प्लेट व गाडीच्या समोर महाराष्ट्र शासन नावाची प्लेट आढळुन आली त्यामुळे हे दोघे सराईत आहेत का? यांनी यापूर्वी असे प्रकार केले आहेत का याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.
Post a Comment