मुंबई : नवी मुंबईतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तडीपार मोर्चानंतर एनआरआय व सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.
या आधीच त्यांच्यावर इतर ठिकाणीही गुन्हे दाखल आहेत. अशात आता भास्कर जाधव व इतरांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.
शिवसेनेचा तडीपार मोर्चा काढण्यात आला होता. ठाकरे गटाने पोलिसांवर दडपशाहीचा आरोप केला होता. ठाकरे गटाचे नेते आणि कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
याप्रकरणी आता यात उपस्थित असलेल्या नेत्यांवर आणि आयोजकांवर गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.
चिथावणीखोर वक्तव्य, अब्रू नुकसान, शांतता भंग, आदेशाची पायमल्ली, हेतू पुरस्कर इजा, बेकायदेशीर समूह जमवणे, त्याचा भाग असणे, मनुष्याला क्रोध येईल, अपमान वाटेल असे वक्तव्य करणे, यासह अन्य कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment