जळगाव : आमदार रवी राणा यांनी जे वक्तव्य केलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे. एका व्यक्तीवर आरोप म्हणजे सर्वच आमदारांवर आरोप करण्यासारखं आहे. कोणी विकावू नाही. पण तुमच्या एका वादामुळे चाळीस आमदारांना बदनाम करण्याची गरज नाही. म्हणून रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावे, असे खडेबोल शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणा यांना सुनावत बच्चू कडू यांची बाजू घेतली.
माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाने राजकारण तापले आहे. रवी राणा यांनी केलेल्या 50 खोक्यांच्या आरोपावरून कडू यांनी निर्वाणीचा इशारा दिला आहे.
आता शिंदे गटातील मंत्री गुलाबराव पाटील यांनी रवी राणांना सुनावत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे.आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्या वादावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रवी राणा यांनी त्यांचे शब्द मागे घेतले नाही, तर ही गोष्ट चुकीची होईल आणि लोकांमध्ये सभ्रम निर्माण होईल. ४० वर्षांचं करिअर लावून लोक तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्या
मुळे रवी राणा यांना आवर घालावी, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना करतो. तसंच दोघांनीही शांत बसवावे, हीच प्रार्थना असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.
Post a Comment