राजीनामा देतो तुम्ही चाळीस लोक राजीनामा द्या.....

अकोला : मला पप्पू म्हणताय. मी राजीनामा देतो तुम्ही चाळीस लोक राजीनामा द्या मग पाहू कोण गद्दार आहेत, असे ओपन चॅलेंज आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले आहे.


शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी बाळापूर इथं सभा पार पडली. या सभेत आदित्य ठाकरे यांनी आमदार नितीन देशमुख यांना व्यासपीठावर मिठ्ठी मारली. 



नितीन देशमुख हे शिंदे गटात न जाता सुरतहून माघारी परतले होते. यावेळी सभेत बोलत असताना आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.

आम्ही डोळ्यात डोळे टाकून सांगू शकतो आम्ही खरे शिवसैनिक आहोत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यातले खरे मुख्यमंत्री कोण आहेत कळत नाही. उद्धव ठाकरे यांनी सुरवातीलाच शेतकऱ्यांची दोन लाखांची कर्ज मुक्ती केली होती. 

हे सरकार काही महिन्यात कोसळणार आहे. उद्योग मंत्र्यांचे उद्योग सर्वांना माहिती आहेत. मी राजीनामा देतो तुम्ही चाळीस लोक राजीनामा द्या, मग पाहू कोण गद्दार आहेत, असे चॅलेंजच आदित्य ठाकरे यांनी दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post