समाज योग्य वेक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो....

नगर : जीवन जगत असताना समाजाचा जो विचार करतो समाजाला बरोबर घेऊन चालतो समाज हिताच्या गोष्टी करतो त्याच वेक्तीच्या पाठीशी समाज खंबीरपणे उभा राहतो असे प्रतिपादन श्रीराम साधनाचें महंत सुनिलगिरी महाराज यांनी केले. 


महिला क्रांती कृषी प्रकिर्या सहकारी संस्था मर्या.धामोरी संस्था संचलित नाईन गूळ उद्योग समूहाच्या नेवासा शहरात कार्यालयांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी महंत सुनिलगिरी महाराच्याहस्ते कार्यालयाची फितकापून शुभारंभ  करण्यात आले. 

यावेळी समूहाचे संस्थापक बाबासाहेब काळे, संस्थेच्या मॅनेजिंग डायरेक्टर सृष्टी काळे, ह.भ.प रामनाथ महाराज पवार, ह.भ.प. विजय महाराज आदि उपस्थित होते. 


या वेळी सुनिलगिरी महाराज बोलताना म्हणाले कि काळे परिवाराने आपल्या जन्म भूमित नाईन गूळ उद्योग समूह सुरू करून तालुक्यातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने आज न्याय मिळवून दिला आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांचा फायदा व्हावा म्हणून  हे पाऊल उचलले आहे.  

यावेळी संस्थापक बाबासाहेब काळे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की गूळ उद्योग समूहाचे सर्व व्यवहार आमच्या संस्था मार्फत चालणार आहे. तालुक्याचे मुख्य असलेल्या बिंदू नेवासा शहरात आज कार्यालयाचे उद्घाटन झाले आहे. लवकरचं भूमिपूजनाचा कार्यक्रम देखिल हाती घेणार असुन हा समूह शेतकरी वर्गा साठी दिशा दर्शक राहील असे हि म्हणाले.

यावेळी श्रीराम साधनाचे प्रमुख उपस्थिती सुनीलगिरी महाराज, हभप रामनाथ महाराज, बाळासाहेब तनपुरे, पोलीस पाटील संघटनेचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण भागवत, सचिन दसपुते, संजय सावंत, नवनाथ पठाडे, बहिरवाडी सरपंच आनंद नांगरे, रावसाहेब काळे, शामराव बोडखे, प्रतीक जाधव, शाम काळे, रवींद्र काळे, योगेश काळे, अशोक नांगरे, बाळासाहेब कनगरे, बहिरवाडी, धामोरी, भालगाव, नेवासा, परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post