निघोज : जीवनात शैक्षणिक, धार्मिक, सामाजिक संस्कृती सर्वाधिक महत्वपूर्ण असून गुरुजन आई-वडील यांचा आदर करुण समाजाभिमुख काम करुण विद्यार्थ्यांनी समाज घडविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र महाराज सुपेकर यांनी व्यक्त केले आहे.
पारनेर तालुक्यातील पठारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे संग काय बापा या तुकाराम महाराजांच्या अभंगावर लहान मुलांच्या भाषेत मार्गदर्शन केले. खडकावर लावलेले रोपटे जसे खडक भेदून अन्नद्रव्य शोधण्यासाठी प्रयत्न करते तसे प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी करून अभ्यास केला पाहिजे प्रयत्न केल्यानंतर जीवनात अपयश कधीच येत नाही.
हे प्रयत्न करीत असताना मुलांनी आपल्या आई वडिलांनी केलेले कष्ट कधीही विसरू नयेत हे सांगताना त्यांनी श्रावण बाळाची व भक्त पुंडलिकाची गोष्ट विद्यार्थ्यांना सांगितली. कधीही खोटे न बोलणे चोरी न करणे आई वडील आणि गुरुजन यांची आज्ञा पाळणे यालाच चारित्र्य असे म्हणतात हे चारित्र्य सर्व विद्यार्थ्यांनी जपले पाहिजे.
दुसऱ्याचे हिसकावून घेतणाऱ्यांचे कधीही पोट भरत नाही जो सर्वांना वाटून देतो तो कधीच उपाशी राहत नाही हे जीवनाचे तत्व आहे .हे तत्त्व प्रत्येक विद्यार्थ्यांनी पाळले पाहिजे तरच आपल्याला चारित्र्यसंपन्न जीवन जगता येईल त्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी माता पिता गुरु बंधू यांची आज्ञा पाळली पाहिजे.
तसेच सुपेकर सर हे शाळेचे माजी विद्यार्थी असून त्यांनी ४५ वर्षांपूर्वीचे या शाळेतील आपले अनुभव सांगितले. यावेळी शाळा समितीचे अध्यक्ष महेंद्र पठारे ,परशुराम पवार मुख्याध्यापिका श्रीमती बबई शिंदे, उपमुख्याध्यापिका श्रीमती शारदा दरेकर ,श्रीमती कविता धोंगडे ,महेंद्र पठारे व गुरुजनांनी सुपेकर सर यांचे धन्यवाद व्यक्त करीत त्यांचा सत्कार करण्यात आला. शारदा दरेकर यांनी सूत्रसंचालन केले. कविता धोंगडे यांनी आभार मानले.
Post a Comment