नगर ः घर म्हटलं की भांड्याला भांडे लागत असते. तसेच कार्यालय म्हटले की एकमेकांमध्ये वाद होतच असतात. मात्र जिल्हा परिषदेत दोन अधिकाऱ्यांमध्ये वादावादी झालेली आहे. या वादाचा ताप मात्र इतर कर्मचाऱ्यांना होत असून त्याची चर्चा सध्या कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार सुरु आहे.
जिल्हा परिषदेमध्ये सध्या प्रशासक राज सुरु आहे. त्यामुळे सगळीकडे अधिकाऱ्यांचीच चलती आहे. यामध्ये ज्यांचे चालते त्यांचे चांगलेच फावसत आहे. काहींनी आपल्या पदाचा फायदा उठवण्यास सुरवात केली आहे.
तसेच काहींनी आपले काम सोपे करून घेत इतरांना त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे. काहीनी तर इतरांना अडचणीत आणण्यासाठी काहींना हताशी धरून तक्रारी व प्रसिध्दी केेली असल्याची चर्चा सध्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरु आहे.
या अगोदरही अधिकारी व कर्मचारी यांच्यात वाद झालेला आहे. या वादातून संबंधित अधिकार्याने इतरांचा अपमान कसा होईल, यासाठी नियोजन केले असल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे.
या वादावादीत जिल्हा परिषदेतून बदलून गेलेल्या काहींचे सत्कार सोहळे झालेले नाहीत. जिल्हा परिषदेच्या गौरवशाली परंपरेला काही अधिकाऱ्यांनी हरताळ फासण्याचा उद्योग सुरु केलेला आहे. व्यक्तीगत वादातून इतर अधिकाऱ्यांना अपमानीत करण्यात येत असल्याची जिल्हा परिषदेत प्रथमच घटना घडत असल्याचे अऩेक कर्मचारी उघडपणे बोलताना सांगत आहेत. हे असेच
प्रकार सुरु राहिले तर तोच पायंडा जिल्हा परिषद कायमचा पडेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे त्यामुळे असे प्रकार थांबण्यासाठी आता माजी पदाधिकार्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत कर्मचाऱ्यांमधून व्यक्त केले जात आहे.
जिल्हा परिषदेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेऊन काहीजण आपला स्वार्थ साधत आहेत. हा स्वार्थ साधताना एकमेकांमधील हेवेदावे त्यातून काढून आपल्या मनाने कारभार केला जात आहे.
हा मनाने कारभाराची सध्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा सुरु आहे. ही कामे करताना काही ठिकाणी नियमाला तिलांजली देऊन गैरकामे करण्यास इतरांना दूरध्वनी केल्याची चर्चा सध्या जिल्हा परिषदेत सुरु आहे.
Post a Comment