लखनऊ : न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने अखेरच्या षटकात 6 विकेटने विजय मिळवला. अवघ्या 100 धावांचे आव्हान पार करताना भारतीय फलंदाजांची दमछाक झाली.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 99 धावा केल्या होत्या. तर भारताने हे आव्हान 4 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. भारताच्या 14.3. षटकात 4 बाद 70 धावा झाल्या होत्या. त्यानतंर हार्दिक पांड्या व सूर्यकुमार यादव यांनी संयमी खेळी करत भारताला विजयाच्या जवळ नेले. दोघांनी 31 धावांची भागिदारी करत विजयावर शिक्कामोर्तब केलं. सूर्यकुमार यादवने चौकार मारत विजय मिळवून दिला.
नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. न्यूझींलडची सुरुवात चांगली झाली होती. संघाच्या 3.2 षटकात 21 धावा झाल्या असताना युझवेंद्र चहलने फिन एलनला बाद केलं. त्यानतंर पुढच्याच षटकात वॉशिंग्टन सुंदरने कॉनवेला बाद करून न्यूझीलंडला दुसरा धक्का दिला. अर्शदीप सिंगने दोन गडी बाद केले तर हार्दिक पांड्या, दीपक हुड्डा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. न्यूझीलंडकडून सँटनरने सर्वाधिक 19 धावा केल्या. तर ब्रेसवेल आणि चॅपमन यांनी प्रत्येकी 14 धावांची खेळी केली. दोन्ही संघाच्या खेळाडूंना एकही षटकार मारता आला नाही.
Post a Comment