अमर छत्तीसे
श्रीगोंदा : मागील महिन्यात काष्टी ग्रामपंचायतीची निवडणूक राज्यभर गाजली आहे. माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांच्या मुलाचा सरपंच पदासाठी पुतण्याने पराभव केल्यामुळे ही निवडणूक चांगलीच चर्चेत आली. या निवडणुकीमुळे साजन पाचपुते तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होणार अशा चर्चा रंगली होती.
सध्या चालू असलेल्या संघाच्या निवडणुकीत साजन पाचपुते कुठेच दिसत नसल्यामुळे साजन नेमके सक्रिय का नाहीत अशी चर्चा कार्यकर्त्यांत होत आहेत.
महिनाभरापूर्वी काष्टी ग्रामपंचायतीची निवडणूक ही आगामी निवडणुकांची नांदी ठरणार असे चित्र निर्माण करण्यात आले होते. स्वर्गीय सदाशिव पाचपुते यांच्या निधनानंतर त्यांना मानणारा गट पोरका झाल्यासारखा होता.
पण साजन यांनी काष्टी ग्रामपंचायतीची निवडणूक लढवून कार्यकर्त्यांना उर्जित अवस्था दिली होती. त्यामुळे साजन आता तालुक्यात सक्रिय होणार असे वाटत होते.
काष्टीची निवडणूक सदाशिव आण्णा पाचपुते यांना माननार्या कार्यकर्त्यां मुळे लढवल्याचे साजन यांनी अनेकदा सांगितले. आता तालुक्यातील सहकारी संस्थेची निवडणूक प्रक्रिया चालू असताना कुठल्याच प्रक्रियेत साजन दिसले नसल्यामुळे कार्यकर्ते ही संभ्रमात दिसतात.
या संघातील बहुतांशी सभासद हे स्वर्गीय सदाशिव पाचपुते यांच्या सुचनेनुसार झालेले आहेत. त्यामुळे अशा सभासदांना काय भूमिका घ्यायची का सर्वपक्षीय नेत्यांना साथ द्यायची अशा संभर्मावस्थेत कार्यकर्ते आहेत.
त्यामुळे आगामी बाजार समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत तरी साजन पाचपुते तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होतील का? असा सवाल उपस्थित केला जातो.
Post a Comment