भाजपच्या मदतीमुळेच तांबे यांचा विजय....

कऱ्हाड : सत्यजित तांबे यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली आहे. त्यामुळे त्यांचा विजय झाला, असा गौप्यस्फोट महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. 


कृष्णा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी मंत्री विखे-पाटील हे कऱ्हाड दौऱ्यावर आले असता, त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी कृष्णा बॅंकेचे अध्यक्ष अतुल भोसले उपस्थित होते. 

मंत्री विखे-पाटील म्हणाले, सत्यजित तांबे यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मदत केली, त्यामुळंच त्यांचा विजय झाला. त्यांनी आता भाजमध्ये जाण्याचाच निर्णय घेतला पाहिजे. ते अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. 

त्यांनी आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभारही मानले आहेत. त्यामुळे त्यांच्या आभारतच त्यांचे उत्तर दडलेल आहे,  असे सांगून त्यांनी अधिक बोलणे टाळले.

विखे यांच्या वक्तव्यावर आता तांबे काय प्रतिक्रिया देतात हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. त्यावरच त्यांची प्रतिक्रिया आल्यानंतर राजकीय हालचाली होणार आहे. तांबे समर्थक आमदार तांबे यांच्या वक्तव्याच्या प्रतिक्रियेची वाट पहात आहेत.

दरम्यान, नाशिक पदवीधर निवडणूक  उमेदवारी अर्ज भरण्याच्या नाट्यापासून राज्यात सर्वाधिक चर्चेत राहिली.सलग तीनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी काँग्रेसने एबी अर्ज दिलेला असतानाही ऐनवेळी माघार घेऊन पुत्र सत्यजित तांबे यांना अपक्ष रिंगणात उतरवले आहे. तेव्हापासून ते आतापर्यंत या विषयी जी चर्चा सुरु आहे, ती कायम आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post