संगमनेर : हिंदू समाजावर होणारे अत्याचार व लव्ह जिहाद विरोधात संगमनेर येथे सकल हिंदू समाजाच्या वतीने भगव्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चानंतर परतताना काही समाज कंटकांनी समनापूर गावातील एका समाजाच्या घरावर दगडफेक केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
समनापूर येथील दगडफेकीत काही चारचाकी व दुचाकी यांचेही नुकसान झाले आहे, तर एक वृद्ध या दगडफेकीत जखमी झाल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे या समाजकंटकांनी पोलिसांच्या समोर दगडफेक करत वाहनांचे नुकसान केले. घटनेनंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा समनापुर गावात तैनात करण्यात आला असून गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
भगवा मोर्चातून परत जाताना तरुणांच्या टोळक्याकडून दगडफेक आणि वाहनांची तोडफोड होत असल्याचे निदर्शनास येत असले तरी या वादाचे मूळ कारण मात्र समजू शकले नाही.

Post a Comment