राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण

पंढरपूर :  गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण लागलेले आहे. पक्षातून अनेक दिग्गज नेते आता बाहेर पडू लागले.  त्यामुळे आता पक्षाचे ज्येष्ठ नेते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले. राज्यातील अनेक जिल्ह्यातील नेत्यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे.


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोलापूर दौऱ्यापासून भगीरथ भालके हे पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात होते. शरद पवार यांनी अप्रत्यक्षरित्या अभिजीत पाटील यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. 

तेव्हापासून भगीरथ भालके हे राष्ट्रवादीवर नाराज होते. ते बीआरएसच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू होती. अखरे त्यांनी आता बीआरएसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन दिवसांपूर्वी बीआरएस आणि एमआयएमला हलक्यात घेण्याची चूक करू नका असं अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना म्हटलं होतं, अखेर याच बीआरएसने राष्ट्रवादीला पंढरपूरमध्ये मोठा दणका दिला आहे. 

अजित पवारांची ती भीती खरी ठरत आहे का? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भगीरथ भालके हे पंढरपूरचे दिवंगत आमदार भारत भालके यांचे पूत्र आहेत.

 2019 च्या पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांचा भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांनी पराभव केला होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post